इलायचीचा वापर आपण मसाल्याचा पदार्थ आणि माउथ फ्रेशनर म्हणून करतो. चहा मध्ये पण इलायची टाकतो. जर तुम्ही इलायची खाऊन गरम पाणी पिण्यामुळे तुम्हाला दुप्पट फायदे मिळतात.
याशिवाय इलायची कफ, खोकला, अस्थमा, मुळव्याध आणि लघवी मध्ये होणारी जळजळ या समस्या दूर करण्यासाठी खूप फायदेशीर ठरते.याच्या सेवन केल्यास हृदय आणि गळ्याला आराम मिळतो. उलटी आणि जीव घाबरणे थांबवते. तोंडाची दुर्गंधी दूर करते.
त्यामुळेच ही बहुउपयोगी आयुर्वेदिक आपल्याला प्रत्येक घरात वापर करताना, पाहायला मिळते. चहा तसेच इतर रेसिपी बनवताना, हमखास याचा उपयोग केला जातो.
याशिवाय अगदी मोठमोठ्या रोगाच्या उपचारांसाठी याचा उपयोग केला जातो. इलायचीचा उपयोग करण्यासाठी ,आपण जर रोज एक किंवा दोन इलायची चावून खाल्ल्याने आपल्याला 5 समस्या दूर होण्यास मदत होईल.
यामध्ये प्रामुख्याने पहिली समस्या आपले अपचन दूर करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. आपली पचनसंस्था ही फास्ट फूडचे अति सेवन, याशिवाय तळलेले पदार्थ यामुळे कमजोर बनते आणि परिणामी आपले अपचन त्रास देऊन निर्माण होतो.यासाठी रोज सकाळी 2 ते 3 इलायची चावून खाल्यास आपली पचनसंस्था मजबूत बनते.
तसेच बऱ्याच लोकांना हा त्रास तोंडाचा घाण वास येण्याची,समस्या त्रास देत असते. तोंडाची दुर्गंधी येणे, यासाठी रोज सकाळी उठल्यावर 2 ते 3 इलायची चावून खाल्यास काही दिवसातच आपले तोंडाची दुर्गधी निघून जाते.
याशिवाय तिसरी समस्या म्हणजे, इलायचीमुळे आपले स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. काही लोकांना अभ्यास असतो, तसेच ज्या लोकांना बौद्धिक काम खूप असते, त्या लोकांनी हा उपाय नक्की केला पाहिजे. त्यामुळे त्याची स्मरणशक्ती बऱ्यापैकी वाढण्यास मदत होते.
बऱ्याच लोकांना विनाकारण डोकेदुखीचा त्रास होत असतो.काही कारण नसताना डोकेदुखी सुरू होते, मग आपण उपचार म्हणून पेनकिलर सारख्या वेगवेगळ्या औषध-गोळ्याचा वापर करत असतो.
असं करण्याऐवजी,रोज सकाळी एक ग्लास पाणी पिऊन, त्यानंतर काही वेळाने या इलायची खाल्याने हा त्रास थोडादिवसात बरा होईल.तसेच हा आयुर्वेदिक उपाय तुम्ही तीन महिने केल्यास,तुमची डोकेदुखीचा त्रास कायमस्वरूपी दूर होईल.
तसेच पाचवा आणि खूप महत्त्वाचा उपयोग म्हणजे, ब-याच जणांना किंवा खासकरून तरुण वयामध्ये मुळा-मुलींना चेहऱ्यावर पिंपल्स किंवा मुरूमचा त्रास असतो.
याशिवाय त्वचेचे विकार किंवा गजकर्णचा त्रास असल्यास ,सकाळी एक ग्लास पाणी पिल्यावर हा उपाय करा.त्यामुळे पिंपल्स अगदी मुळापासून निघून जातील तसेच गजकर्णचा त्रासही दूर होईल.या उपायामुळे सर्व प्रकारचे त्वचारोग नाहीसे होतात.
याशिवाय इलायची,आपल्या शरीरातील रक्त शुद्ध करण्याचे काम ही करत असते.अशा प्रकारचे हे 5 रोग अगदी मुळापासून बरे करण्यास इलायची मदत करते.