नाती खूप गुंतागुंतीची असतात ती काळजीपूर्वक हाताळावी लागतात आणि टिकवायची असतील तर या गोष्टी लक्षात सुद्धा ठेवाव्या लागतात. तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल किंवा विवाहित, तुम्हाला तुमचं नातं टिकवायचं असेल तर तुम्ही काही चुका टाळल्या पाहिजेत. नात्यात किरकोळ भांडणं, वाद होणे साहजिक आहे. अनेकवेळा अशा विभक्त झाल्यानंतर नाते पुन्हा रुळावर येते. परंतु अनेक वेळा वाद आणि भांडणे खूप वाढतात आणि ही भांडणं नातं तुटण्याचे कारण बनू शकतात.
आजकाल बहुतेक नाती तुटण्याची सुरुवात काही सामान्य चुकांमुळे होते. जर तुम्ही तुमच्या नात्यातील या चुका टाळल्या तर तुमचं नातं दीर्घकाळ टिकू शकतं. चला तर मग जाणून घेऊया अनवधानाने झालेल्या कोणत्या चुका तुमचं नातं तुटायला कारणीभूत ठरू शकतात.
जोडीदाराची फसवणूक करत आहात
प्रामाणिकपणावर आधारलेलं नातच खरं नातं असतं. तुम्ही तुमच्या जोडीदाराशी नेहमी एकनिष्ठ राहा. फसवणूक ही सर्वात मोठी चूक आहे जी नातेसंबंध बिघडवते. बहुतेक लोक जेव्हा नातेसंबंधात एकत्र येतात तेव्हा त्यांच्या जोडीदाराकडून निष्ठेची अपेक्षा करतात.
अशा वेळी जर अशी एखादी गोष्ट त्यांच्यासमोर आली की ज्यामुळे तुम्ही त्यांची फसवणूक करत आहात याची त्यांना जाणीव होते, तर त्यांच्या विश्वासाला तडा जातो. त्यामुळे जर तुम्हाला आनंदी नातं हवं असेल तर तुमच्या जोडीदाराची फसवणूक करण्याचा विचारही करू नका.
जोडीदाराला वेळ देत नसाल
चांगल्या नात्यासाठी आपापसात संवाद आणि प्रेम असणं आवश्यक आहे. जर तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी दररोज थोडा वेळ काढू शकत नसाल तर पुढे जाऊन त्याचा परिणाम म्हणून तुमचं नातं बिघडू शकतं.
जर तुम्ही विभक्त कुटुंबात रहात असाल किंवा जोडीदारासोबत एकटे राहत असाल, तर संवाद हा खूप महत्त्वाचा आहे. जोडीदाराला वेळ न दिल्याने नात्यातील विश्वास संपतो आणि काही काळानंतर नातं तुटण्याच्या दिशेने वाटचाल करू लागतं.
घरातल्या शिव्या आणि मारामारी
नातेसंबंधात निष्ठा आणि प्रेम जितकं महत्त्वाचं आहे, तितकच महत्त्वाचं आहे जोडीदाराला आदर देणे. बऱ्याच वेळेस अनेकदा ती तुटण्याची वेळ केव्हा येते जेव्हा एक जोडीदार आपल्या दुसऱ्या जोडीदाराचा अपमान करतो आणि शिवीगाळ करतो.
शारीरिक किंवा शाब्दिक हिंसाचाराला नात्यात स्थान नसावं. किरकोळ चुकांवर तुम्ही तुमच्या जोडीदाराला शिवीगाळ, किंवा मारहाण केली तर काही काळानंतर ब्रेकअप होणे किंवा घटस्फोट होणे स्वाभाविक आहे. जर तुम्हाला लवकर राग येत असेल तर त्यावर नियंत्रण ठेवण्याचे मार्ग शोधा. भांडण किंवा वाद झाल्यास, स्वतः तिथून निघून जा आणि तुमचा राग शांत करा.
खोटं बोलताय आणि गोष्टी लपवताय
खोटे बोलणे किंवा लपवणे यामुळे हळूहळू संशय निर्माण होतो आणि संशयामुळे कोणतंही नातं बिघडू शकतं. आपलं काही प्रकरण समोर आलं तर आपलं काय होईल या विचाराने अनेक वेळा लोक आपल्या पार्टनरसोबत खोटं बोलतात. पण हे खोटं पुन्हा पुन्हा समोर आलं तर नात्याची भिंत हळूहळू खचू लागते. त्यामुळे तुमच्या पार्टनरला नेहमी सत्य सांगा आणि काहीही लपवू नका.
संसारातल्या प्रत्येक प्रश्नावर उत्तर शोधत नसाल तर
प्रत्येक कुटुंबात आणि प्रत्येक नातेसंबंधात लहान समस्या राहतात. अशा परिस्थितीत, जर तुमचा जोडीदार एखाद्या समस्येचा सामना करत असेल आणि ते तुमच्याशी याबद्दल बोलत असतील, तर तुम्ही त्या समस्येवर प्रत्येक प्रकारे मात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
जर तुम्ही तुमच्या कामात व्यस्त असल्याच्या बहाण्याने समस्या टाळण्याचा प्रयत्न करत असाल तर हळूहळू त्यांचा तुमच्या नात्यावर नकारात्मक परिणाम होऊ लागतो. त्यामुळे समस्या टाळण्याऐवजी त्या सोडवण्याचा प्रयत्न करा. आयुष्यापासून पळून जाणारे लोक कधीच यशस्वी नातं निभावू शकत नाहीत.
जर तुम्ही नात्यात या चुका टाळल्या आणि तुमच्या जोडीदाराला पूर्ण प्रेम, आदर आणि वेळ दिला तर तुमचं नातं बहरत राहील. तुम्हाला घट्ट आणि परिपूर्ण नात्यासाठी शुभेच्छा!