लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असं म्हणतात पण लग्नाचा निर्णय आपल्यालाच घ्यावा लागतो. लग्नाचा निर्णय खूप महत्वाचा आहे. तुम्हाला संपूर्ण आयुष्य एका अनोळखी व्यक्तीसोबत घालवायचं आहे त्यामुळे हा निर्णय अतिशय काळजीपूर्वक घ्या.
जर तुम्ही लग्न करण्याचा विचार करत असाल तर, होणा-या नवऱ्याचे हे गुण पहा
लग्न हे प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील सर्वात खास बंधन आहे. जर तुम्ही लग्न करत असाल तर याचा अर्थ असा आहे की तुम्हाला तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण त्या व्यक्तीसोबत घालवावा लागेल. मग तो मुलगा असो वा मुलगी. प्रत्येक व्यक्ती आपल्या जोडीदारासोबतचे नाते घट्ट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असते.
आयुष्याचा जोडीदार निवडताना मुलं अनेकदा घाई करतात, पण या आयुष्यभराच्या नात्यात कोणत्याही व्यक्तीचा हात धरण्यापूर्वी मुली 100 वेळा विचार करतात. ती ज्याच्याशी लग्न करत आहे त्याने तिची काळजी घ्यावी, तिच्यावर प्रेम करावे, तिच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात, अशी प्रत्येक मुलीची इच्छा असते. जर तुम्हीही लग्नाचे स्वप्न पाहत असाल तर तुमच्या भावी पतीमध्ये ह्या गोष्टी आहेत का ते बघा.
सपोर्ट/ पाठिंबा देणारा आहे का?
पाठींबा देणे म्हणजे पती तुम्हाला आर्थिक मदत करेल असा अजिबात नाही. सपोर्ट म्हणजे तो तुम्हाला नोकरी, घरचे निर्णय, वैयक्तिक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देतो की नाही. लक्षात ठेवा की समर्थन असण्याचा अर्थ असा नाही की जोडीदाराने तुमचं चुकीच्या निर्णयांमध्ये समर्थन केलं पाहिजे.
जर तुम्ही कधी चुकीचा निर्णय घेत असाल तर आयुष्याचा जोडीदार म्हणून तुम्हाला समजावून सांगणे हे पतीचं कर्तव्य आहे. असा नवरा म्हणून निवड ज्याची मतं स्पष्ट असतील हो तरी नाहीतर नाही तरी. संभ्रमित मुलाशी लग्न करू नका.
विश्वास जपणारा विश्वासाचा माणूस शोधा
लग्न ही अशी गोष्ट आहे ज्यामध्ये विश्वास सर्वात जास्त महत्त्वाचा असतो. पती-पत्नीचं नातं हे विश्वासावर आधारित असतं. त्यामुळे लग्नाआधी प्रत्येक मुलीला नवरा असावा, तो किती विश्वासार्ह व्यक्ती आहे हे जाणून घेतलच पाहिजे.
तुम्ही ज्याच्याशी लग्न करणार आहात त्याबद्दल तुम्हाला काही चुकीच्या किंवा फसव्या गोष्टी ऐकायला मिळाल्यास, संबंध जोडण्यापूर्वी पुन्हा विचार करा कारण असा माणूस तुम्हाला सुद्धा फसवू शकतो जरी तो तुमच्याशी कितीही चांगला वागत असेल.
फक्त तुमचाच नाही तर तुमच्या कुटुंबाचाही आदर करणारा हवा
ज्येष्ठांचा आदर करणे हे प्रत्येक समजदार माणसाचे पहिले लक्षण आहे. लग्नापूर्वी प्रत्येक मुलीने हे लक्षात ठेवले पाहिजे की तिच्या भावी पतीने तिच्याशी फक्त प्रेमाने बोलू नये तर तिच्या कुटुंबावरही प्रेम केले पाहिजे. मुलींनी नेहमीच असा जीवनसाथी निवडावा जो सर्व वयोगटातील लोकांचा आदर करेल.
तुमच्या म्हणण्याकडे पूर्ण लक्ष देणारा
प्रत्येक मुलीची इच्छा असते की तिचा जीवनसाथी असा असावा जो गोष्टी लक्षपूर्वक ऐकतो. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्याचा सल्ला घ्या. पती-पत्नी दोघेही आर्थिकदृष्ट्या मजबूत असतील, तर पतीने आपल्यासोबत निर्णय घ्यावेत, अशी मुलीची इच्छा असते. जर मुलगा नीट लक्षपूर्वक ऐकत नसेल आणि तुम्हाला काय म्हणायचं असेल हे त्याला समजून घेण्यात स्वारस्य नसेल तर असा नवरा तुम्हाला जाचक वाटेल.
आधी मित्र मग नवरा
आयुष्याच्या जोडीदाराच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यापूर्वी तिचा भावी नवरा मित्र बनला पाहिजे, असं प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं. अनेक वेळा नात्यात असं दिसून येतं की मुलींना सर्व त्रास, समस्या पतीसोबत शेअर करता येत नाहीत.
म्हणूनच अशा माणसाला जीवनसाथी बनवण्याचा विचार नेहमी केला पाहिजे जो फक्त ऐकतोच असं नाही तर त्याला काहीही सांगायला तुमच्या मनात संको नसतो. तुमच्या नवऱ्यासोबत मित्रांप्रमाणे खुलेपणाने हसू शकता, विनोद करू शकता, मजा करू शकता. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन जीवनसाथी निवडा.
तर शेवटी एक आदर्श जीवनसाथी तोच जो आपल्या जोडीदारावर कायमच नितांत प्रेम करतो. जोडीदाराला कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर ती समजून घेऊन ती दूर करतो. अशा मुलालाच आयुष्यभराचा जीवनसाथी म्हणून निवडा.