आपल्यापैकी जवळजवळ 99 % लोक सकाळची सुरुवात चहा किंवा कॉफीने करत असतात. मात्र यामुळे त्याच्या शरीरावर कय परिणाम होतो हे अनेक लोकांना माहिती नाही. चला तर जाणून घेऊ घेऊया…
सकाळच्या टिप्स:
अनेक लोकांना नेहमी प्रश्न पडत असतो की, सकाळी सर्वात आधी काय खाता याने काही फरक पडतो का? मात्र याविषयी तुम्ही आरोग्य तज्ञांना किंवा आहार तज्ञांना विचाराल तर ते म्हणतील नक्कीच होकार देतील. कारण तज्ञांच्या मते, दिवसाचे पहिले जेवण असे असावे की ज्यामुळे तुम्हाला संपूर्ण दिवस ऊर्जा मिळेल. संशोधन असेही सूचित करते की, सकाळचा नाश्ता चरबी आणि प्रथिनांनी भरलेला असावा. ज्यामुळे खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होईल आणि मिठाईची इच्छा देखील कमी करतात.
तथापि, बहुतेक लोक दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफीने करतात. एका न्यूट्रिशनिस्टनी नुकतेच एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे सांगितले की, दिवसाची सुरुवात कोणत्या प्रकारच्या अन्नाने करावी. त्यांच्या मते दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफीने करू नये, तर केळी, भिजवलेले बदाम किंवा मनुका याने करावी. चला तर मग जाणून घेऊया याचे शरीराला काय फायदे होतात.
1.जर तुम्हाला पचन, गॅस, फुगवणे किंवा एनर्जीची कमतरता असा त्रास होत असेल आणि खाल्ल्यानंतर गोड खाण्याची इच्छा असेल तर तुम्ही दिवसाची सुरुवात केळीने करावी. जर तुम्हाला केळी आवडत नसेल तर तुम्ही कोणतेही हंगामी फळ खाऊ शकता.
2.कारण सकाळी केळी खाल्यास ज्या लोकांना पचनाच्या समस्या दूर होते. याचबरोबर, गोड खाण्याची आवड आहे त्यांनी सकाळी प्रथम केळी खावी. आठवड्यातून 2-3 वेळा केळी खरेदी करा आणि प्लास्टिकच्या ऐवजी कापडी पिशवीत आणा.
3.दुसरा पर्याय म्हणजे 6 ते 7 भिजवलेले मनुके खा. कारण जर PMS तुम्हाला त्रास देत असेल तर 10 दिवस आधी केशर घालून मनुके खाण्याचा सल्ला दिला जातो. तसेच तपकिरी मनुकाऐवजी काळे मनुके खा, असेही त्यांनी स्पष्ट केले. भिजवलेले मनुके हिमोग्लोबिन, गॅस, मूड स्विंग किंवा पीसीओडीची समस्या दूर करतात.
4.तिसरा पर्याय म्हणजे भिजवलेले बदाम खाणे. 4-5 भिजवलेले बदाम सोलून खा. जर तुम्हाला मधुमेह, खराब झोप, पीसीओडी इत्यादींचा त्रास होत असेल तर तुम्हाला याचा फायदा मिळेल.
5.दिवसाची सुरुवात या तीनपैकी एका गोष्टीने करा आणि त्यानंतर 10-15 मिनिटांनी तुम्ही चहा किंवा कॉफी पिऊ शकता.
- याचबरोबर, सर्वात महत्त्वाचे म्हणजे वरील नमूद केलेल्या गोष्टी खाण्यापूर्वी एक ग्लास पाणी प्या.
- उठल्यानंतर किंवा थायरॉईडचे औषध घेतल्यानंतर 20 मिनिटांत या गोष्टी खा.
- जर तुम्ही सकाळी वर्कआउट किंवा योगा करत असाल तर जेवल्यानंतर 15-20 मिनिटांनी करा.
- जर तुम्ही व्यायाम करत नसाल तर ते खाल्ल्यानंतर एक तासानंतर नाश्ता करा.
- मनुका ज्या पाण्यात भिजवलेले आहे ते पाणीही प्यायला मिळते.